Monday, 23 March 2020

कोरोना संदर्भातील नोंदी.

दि.15 मार्च पासून शाळा बंद चा आदेश आला व सकाळी आम्ही शाळेत जात होतो. शाळेत जाऊन शाळाबंद चे आदेश तामील करायचे होते.त्याप्रमाणे शाळेत गेलोत.सर्वकाही प्रशासकीय बाबी पूर्ण करून घरी आलोत.खूप दिवसांनी म्हणजे तरी एक महिन्यापासून ऐकून होतो की कोरोना हा जीवाणू अनेक देशात थैमान घालत आहे.भारतात मात्र अजून सुरुवात झालेले नव्हती. पण अचानक 9 मार्च पासून कोरोनाचे आजारी व्यक्ती देशात ही सापडू लागले व सर्वत्र हाहाकार सुरू झाला.प्रथम सर्व शासकीय कार्यालयाना सुट्टी जाहीर केली व तसे आदेश ही पारित केले.आम्ही शाळेतील सर्वच शिक्षक घाबरून गेलो होतो.सतर्क होऊ लागलो होतो.मास्क लावणे सुरू केले होते.आम्ही तर सरकारी दवाखान्यात गेलो व सर्व precautions विचारून आलो.तसेच काही मास्क,sanitizer घेऊन सुध्दा आलोत.सुट्टीत काय काय करायचे ? हे आम्ही ठरवू लागलो होतो. खूप वाचन करणे,लेखन करणे,ध्यान धारणा करणे.असे अनेक आखाडे मनात ठरवू लागलो होतो.त्याप्रमाणे आम्ही कार्य सुरू ही केले होते.एक दिवस जात होता व रोज नवनवीन आदेश शासन,प्रशासन काढत होते.19 मार्च ला दोन कार्यक्रम होते.हे दोन्ही कार्यक्रम रद्द झाले होते.जिल्हाधिकारी श्री रेखावार साहेब यांनी सर्व गर्दीचे समूहाचे उपक्रम व कार्यक्रम परवाने रद्द केले होते.एक कार्यक्रम-19 मार्च प्रथम शेतकरी कुटुंबाची आत्महत्या म्हणून अन्नत्याग आंदोलन कार्यक्रम व स्टाफचे सहकारी श्री तोडकर सर यांचा वास्तू शांती व वास्तू पूजन कार्यक्रम .हे दोन्ही कार्यक्रम 15 मार्चला रद्द झाली. त्यानुसार 19 मार्चला फक्त आम्ही अन्नत्याग उपवास दिवसभर वैयक्तिक स्तरावर ठेवू शकलोत. शेतकरी विरोधी भावना व्यक्त करण्यासाठी उपवास एक दिवस रोज्यासारखा केला.वेगळाच अनुभव आला.अनेक अनुभव आले.एक अनुभव असा की नाक खूप तीव्र झाले दिवसभर.अनेक वास खूपच सुंगधीत येऊ लागले.एरव्ही येत नव्हते.पण उपवास दिशी अनेक ठिकाणचे वास आम्हाला परेशान करीत होते.तरीपण आम्ही दुर्लक्ष करीत सकाळी 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत फक्त पाणी घेऊन उपवास केला.कृतज्ञता व्यक्त करताना शेतकऱ्यांनाबद्दल खूप जाणीव निर्मिती झाली.खूप स्मरण केले.चिंतन केले.आजच्या यावेळेपर्यंत इतकेच .उर्वरित नंतर लिहितोत.

Friday, 13 March 2020

Nanded photos of program


First time writing on my blogger.

आज खूप वर्षांनी ब्लॉग वर आलो.माझे ब्लॉग अकाउंट 2015 मध्ये काढलेले आहे.आणि त्यांनंतर मी बिलकुल वापरले नाही. परंतु आज वापरण्याची गरज वाटत आहे.म्हणून आजपासून blogger म्हणून माझे लेखन या ब्लॉग वर देणार आहे.आशा आहे की हा लेखनप्रवास निश्चित सुखकर व मार्गदर्शक होईल.या ब्लॉग वर सर्व विषय मी लेखनासाठी घेणार आहे.शैक्षणिक, सामाजिक,राजकीय,पर्यावरण, अध्यात्मिक,खेळ,साहित्य,ध्यान,आरोग्य ई. विविध विषयांवर मी माझे विचार मांडणार आहे.शाळेविषयी, घरांविषयी,गावांविषयी,परिसरांविषयी,समाजाविषयी माझे मते,माझे विचार,माझे चिंतन या ब्लॉग वर मांडणार आहे.